Ad will apear here
Next
‘आजच्या पिढीने सज्ञानी व बलवान असावे’
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयात 'व्यक्तिमत्व विकास' या विषयावर व्याख्यान देताना भंडारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीश आनंदराव देशमुख.कोल्हापूर : ‘वाईट परिस्थिती माणसाला जीवनामध्ये संघर्ष करायला शिकवते. माणसाला चांगले दिवस येण्यासाठी हेच मोठे विद्यापीठ असते. आजच्या पिढीने व्यक्तिमत्त्व विकासासाठी सज्ञानी व बलवान व्हायला पाहिजे,’ असे प्रतिपादन भंडारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीश आनंदराव देशमुख यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी भूषविले.

‘विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखणे गरजेचे असून, दररोज व्यायाम करणे, चांगला आहार व सकारात्मक जगणे यातूनच जीवन चांगले घडते,’ असे विचार देशमुख यांनी मांडले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य साळुंखे म्हणाले, ‘स्वतःला व जगाला ओळखायला शिका. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे अडचणीतून जगायला शिकले. ज्ञान आणि संस्कारांनी त्यांना घडविले. विवेकानंद शिक्षण संस्था उभी करून त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणातून सामाजिक विकासाचा ध्यास घेतला पाहिजे. समाज घडविण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे आहे.’

प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थनागीत सादर करण्यात आले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी करून दिला. या वेळी प्रा. मिलिंद कारंजकर यांनी ‘संशोधनातून व्यक्तिमत्त्व विकास कसा साधला जातो’ यावर आपले विचार मांडले. प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. डी. जोशी यांनी आभार मानले.
 
या वेळी महाविद्यालयातील डॉ. डी. ए. देसाई, डॉ. आरिफ महात, डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. एच. पी. पाटील, डॉ. पी. ए. पाटील, डॉ. मंजुश्री घोरपडे, डॉ. माधवी चरणकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZAYBE
Similar Posts
विवेकानंद महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी कोल्हापूर : ‘महाराष्ट्राच्या इतिहासात महात्मा फुलेंनी सुरू केलेली सामाजिक चळवळ पुढे नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. वेदोक्त प्रकरणातून त्यांना सामाजिक विषमतेची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी बहुजनांवर होणारा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक अन्याय दूर करण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यांच्या
विवेकानंद महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा कोल्हापूर :  ‘ब्रिटीशांच्या गुलामीतून मुक्त होऊन भारतीय स्वातंत्र्याला आज ७० वर्षे झाली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सर्व युवकांनी राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन समाजकार्यात उतरले पाहिजे व या देशाला प्रगतीपथाकडे नेले पाहिजे.’ असे विचार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनदेखील करावे ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ
‘विवेकानंद’मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू कोल्हापूर : गोवा येथील जीव्हीके ईएमआरआय आणि कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने विवेकानंद महाविद्यालयात २० जुलै २०१७ रोजी इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन या पदासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. १०८ अॅम्ब्युलन्स सेवेकरिता हे पद आहे. जे विद्यार्थी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language